उड़द दाळ = 1 कप
रवा =2 कप
पानी =2 कप
टमाटर =2
शिमला मिरची =2
कांदा =1 मध्यम
चीज =1 कप कीस
मिठ = स्वादानुसार
कृति
दाळ चार-पाच तास पाण्यात भिजवुन घ्या, व वाटुन घ्या . वाटलेल्या दाळमध्ये रवा व मिठ टाकुन एकत्र करुन इडलीसाठी मिश्रण तैयार करा या मिश्रणाला फुलण्यासाठी रात्रभर ठेवा .दुस-या दिवशी या मिश्रणाला एका भांडयात टाका व कुकर मध्ये वाफ घ्या . पाच मिनट ठेवा . त्याला बाहेर काढुन वरुन चीज, कापलेला कांदा , टमाटर इ. टाका व परत वाफवा याचे तुकडे करा .
फोडणीसाठी : तेल, मोहरी, हिंग, मिरची, पाणी (कढीपत्ता आणि तीळ ऐच्छिक)
कृति- मूगडाळ दोन-तीन तास आधी भिजत घालावी. भिजलेली डाळ शक्य तेवढं कमी पाणी वापरून मिक्सरमध्ये रवाळ वाटावी. वाटतानाच त्यात आलं, लसूण आणि दोन मिरच्या घालाव्यात.वाटल्यानंतर हे मिश्रण एका भांड्यात काढून त्यात मीठ, किंचित साखर, लिंबाचा सत्व आणि थोडी हळद घालून नीट मिसळावे. कुकरमध्ये पाणी घालून गॅसवर ठेवावे. ज्या भांड्यात ढोकळा करायचा आहे, त्याला आतून सगळ्या बाजूनं नीट तेल लावावं. वरच्या मिश्रणात सोडा टाकून हलक्या हाताने पुन्हा एकदा नीट मिसळावं.हे मिश्रण आता तेल लावलेल्या भांड्यात ओतून भांड कुकरमध्ये ठेवावं. साधारण १५-२० मिनिटं वाफवावं आणि बंद करून ७-८ मिनिटं तसंच ठेवावं. बाहेर काढून वाफ गेल्यावर तुकडे करावेत. फोडणीसाठी एका भांड्यात तेल तापवून त्यात मोहरी, हिंग व मिरच्यांचे तुकडे टाकावेत.त्यात पाणी घालून पुन्हा एक उकळी आणावी. नंतर चमच्यानं ही फोडणी ढोकळ्यावर सगळीकडे पसरावी. वर कोथिंबीर भुरभुरावी.
कृती : सर्वप्रथम तीळ भाजून बारीक करुन घ्या. नंतर खसखसही भाजून घ्यावी. तीळ, किसलेला गुळ, खसखस व तूप एकत्र करुन त्याचे सारण तयार करुन घ्या. मैद्यामध्ये मोहन घालून चांगले एकजीव करुन घ्या. चवीकरिता थोडे मीठ घालून दुधाने किवा पाण्याने मैदा घट्ट शिजवून घ्या. दहा मिनिटे झाकून ठेवा. नंतर हव्या तेवढ्या आकाराच्या पुर्या लाटून त्यात करंजीप्रमाणे तिळाचे सारण भरा. तूपात ह्या करंज्या तळाव्यात.
कृती : सर्वप्रथम मैद्यात मोहन घालून पीठ भिजवून ठेवावे. नंतर लिंबा एवढी गोळी घेऊन पातळ पातळ लाटून घ्यावी. आता सारण भरण्यासाठी चण्याची डाळ वाटून घ्यावी. या पेस्टमध्ये साखर व इतर मेवा घालून सोनेरी होईपर्यंत भाजून घ्यावे. आता लाटलेल्या पुरीला मधून अर्धे काप करावे. अर्धी कापलेली पुरीला समोसा सारखा आकार देऊन त्यात तयार केलेले सारण भरून त्याला तळून घ्यावे. नंतर साखरेत अर्धा कप पाण घालून चाशनी तयार करावी व ती थंड झाल्यावर तयार सोमेसे त्यात टाकून लगेचच काढावे.
कृती : सर्वप्रथम ताकात बेसन, मीठ, तिखट, हळद आणि दीड कप पाणी घालून त्याचा घोळ तयार करावा. तूप गरम करून त्यात मोहरी, हिंग, साबूत लाल मिरच्या व कढी पत्त्यांची फोडणी द्यावी. आता मुगवडी घालून चांगले परतून घ्यावे. नंतर ताक-बेसनाचा घोळ, हिरव्या मिरच्या घालून चांगले हालवावे. एक उकळी आल्यावर मंद आच करून 10-15 मिनिट शिजवावे. सर्वात शेवटी कोथिंबीर, घालून गरमा गरम सर्व्ह करारी.
साहित्य : 5 अळूची पाने, 1 वाटी बेसन, 1 चमचा तिखट, मीठ चवीप्रमाणे, चिंच, गूळ, धने व जिरे यांची पूड, हिंग तीळ, मोहरी, जिरं व तेल.
कृती : सर्वप्रथम पाने स्वच्छ धुवावी व बेसनमध्ये चिंचेचे पाणी, गूळ, तिखट, मीठ धन्याजिर्याची पूड व हिंगाची पूड घालून पीठ भज्यांच्या पीठासारखे चांगले भिजवावे. नंतर अळूच्या पानाच्या पालथ्या बाजूवर पीठ पातळसर लावावे. त्याच्यावर दुसरे पान ठेवून त्याला पीठ लावावे. या प्रमाणे एकावर एक अशी चार पाने ठेवावी. नंतर त्या पानांची गुंडाळी करून ती वाफवून घ्यावी व काप करावेत. फोडणीत तीळ घालून त्यात ते काप चांगले परतून घ्यावे.
साहित्य - ५०० ग्रॅम मध्यम आकाराचे चिकनचे तुकडे, ४ मध्यम कांदे, १ टी स्पून लसूण पेस्ट, १ टी स्पून आलं पेस्ट, १ टेबल स्पून गरम मसाला, २ टेबल स्पून कोल्हापूरी चटणी, हळद, मीठ, अर्धी वाटी बारीक चिरलेली कोथिंबीर.
कृति- प्रथम चिकनचे तुकडे स्वच्छ करुन पाणी काढून टाकणे. नंतर हळद, मीठ, आलं, लसूण पेस्ट, गरम मसाला, कोल्हापूरी चटणी हे सर्व साहित्य चिकनला लावून ठेवणे, नंतर कढईत तेल टाकून गरम करणे त्यात बारीक चिरलेले कांदे टाकणे, गुलाबी रंग आल्यावर मसाला लावलेलं चिकन त्यात टाकून वर झाकण ठेवून शिजवून घेणे. शिजल्यावर गॅस बंद करुन कोथिंबीर टाकणे
4मध्यम आकाराचे उकडलेले बटाटे, अर्धा वाटी भिजलेले साबुदाने, हिरवी मिरची ,अदरक पेस्ट, शोफ, मिठ, निंबुचा रस, साखर, तेल.
कृति- पोहे 2ते3 पाण्याने धुवुन घ्या.उकळलेले बटाटे व वाटाणे मेश करुन घ्या.त्यात हिरवी मिरची ,अदरक पेस्ट ,कापलेला कांदा,शोफ,मिठ, साखर,निंबु रस टाकुन चांगले एकत्र करा.त्यात भिजलेले पोहे टाकुन मिक्स करा. या मिश्रनाचे रोल करुन भिजलेल्या साबुदान्यात लपेटावे व सोनेरी रंग येइ पर्यात तळावे .कटलेट प्लेटमध्ये ठेवुन वरुन शेव टाकावी व हिरव्या चटणीसोबत किंवा सॉस सोबत खायला दया.
कृति-पोहे दोन पाण्याने धुवा एक तास पाण्यात भिजवा.थोड पाणी राहु दया. त्यात मिठ, जिर व बारीक केलेल्या मिरच्या टाकाव्या.तीला चांगले मळुन घ्या.चकली मेकरमध्ये टाकुन त्याची शेव पाडा . व उन्हात वाळवा. सुकल्यावर डब्यात भरा. व पाहीजे तेव्हा तळता येतात.
साहित्य- 1किलो बटाटे, बादाम 50 ग्रम, काजु 100 ग्रम , पिस्ता 50 ग्रम, किशमिश 50 ग्रम , सफेद तिळ 1 चमच, जीरा 1 छोटा चमचा , हिरवी मिरची कापलेली , कढीपत्ता , साखर बारीक
केलेली 50 ग्रम , सेंधव मिठ 3छोटे चमचे , तेल,


















